मागच्या महिन्यात, बॉलीवूडचा एक नवीन चित्रपट वितरण होण्याआधीच बराच गाजला. एका राजकीय पक्षाने आपण तो चित्रपट वितरण होऊ नये यासाठी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. त्याबरोबर
सर्व माध्यमाना एक नवीन ब्रेकिंग न्यूज मिळाल्याचा हर्षानंद झाला व काही
ना काही पद्धतीने या चित्रपटासंबंधीच्या बातम्या सतत लोकांपुढे येत राहतील
याची त्यांनी व्यवस्था केली. साहजिकच लोकांच्यात, विशेषत: स्त्रीवृंदाला, चर्चा करण्यास एक नवीन विषय मिळाला. ” ए, तू बघितलास का MNIK” ” नाही ग! तिकिटेच मिळत नाहीयेत!” वगैरे वगैरे.
दोन चार दिवसांनी या राजकीय पक्षाने आपले आंदोलन मागे घेतले. चित्रपटाचे वितरण झाले. एक आठवडाभर तरी ब्रेकिंग न्यूज मधे असलेला हा चित्रपट शेवटी आपल्याला बघायला मिळणार म्हणून लोकांनी प्रचंड गर्दी केली. थोड्या दिवसातच चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक यांच्या लक्षात आले की चित्रपट अगदीच सामान्य दर्जाचा आहे. बुद्धीवैभवाचा अभाव असलेले व प्रत्येक चित्रपट आवडीने बघणारे काही प्रेक्षक सोडले, तर बाकी प्रेक्षकांना आपण पद्धतशीर रित्या गंडवलो गेलो आहोत याची जाणीव प्रकर्षाने झाली.अर्थात त्यांना हे समजेपर्यंत चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपला भांडवली खर्च व फायदा हे दोन्ही कमावले होते पण ही बाब फारशी कोणाच्या लक्षात आली नाही.

‘वादाचा भोवरा‘ हा कोणत्याही उत्पादनाचे, निर्मितीचे किंवा प्रकल्पाचे, कमी खर्चात प्रभावी मार्केटिंग करण्याचा एक नवीन मार्ग उपलब्ध आहे याची जाणीव उत्पादकांना, निर्मितीकारांना किंवा प्रकल्प सादर करणार्यांना आता झाली आहे असे दिसते. आपले सामान्य दर्जाचे उत्पादन किंवा निर्मिती, लोकांच्यापर्यंत फारशी जाहिरातबाजी व खर्च न करता, या पद्धतीने पोचवता येते. अगदी एखाद्या राजकीय पक्षाने सुद्धा ही पद्धत अवलंबली तर तो अल्प कालात लोकांच्या नजरेसमोर चमकू शकतो. महाराष्ट्रात उदयाला आलेल्या एका नवीन राजकीय पक्षाने हीच पद्धत अवलंबली आहे. एका वादाच्या भोवर्यातून हा पक्ष बाहेर पडतो न पडतो तोच त्या पक्षाचे नेते परत काहीतरी आक्षेपार्ह विधाने करतात. परत एकदा ब्रेकिंग न्यूज आणि वादाचा भोवरा. प्रत्येक वादाच्या भोवर्याचे एकूण फलित, त्या पक्षाची वाढती लोकप्रियता हे असल्याने, हा पक्ष आता बराच लोकप्रिय झाल्यासारखा निदान दिसतो तरी आहे.
मॅकडॉनल्ड्स सारख्या फास्ट फूड साखळ्यांनी तर हे वादाच्या भोवर्याचे तंत्र चांगलेच आत्मसात केले आहे. कधीतरी कोणता तरी एक शास्त्रीय अहवाल प्रसिद्ध होतो. त्यात फास्ट फूड कसे हानीकारक आहे याचे भयानक चित्र उभे केलेले असते. लगेच माध्यमे त्या बातमीवर तुटून पडतात. परिणामी मॅकडॉनल्ड्सची विक्री आणखी वाढते. कधी ते विकत असलेले अन्न जंक फूड आहे म्हणून वाद तर कधी ट्रान्सफॅट्सच्या वापराबद्दल तर कधी ते वापरत असलेले मांस, हलाल आहे की नाही यावरून. थोड्या फार प्रमाणात हेच तंत्र कोका कोला किंवा पेप्सी सारखे सोडा उत्पादक वापरतात. मॅकडॉनल्ड्स घ्या किंवा कोक किंवा पेप्सी त्यांची विक्री या वादामुळे कधी कमी झाल्याचे ऐकले आहे का? नवीन वाद निर्माण झाला की उलटी ती आणखीन वाढतेच.

गॉल्फ सम्राट टायगर वूड्सचे उदाहरण आपल्या सगळ्यांना आठवत असेल. त्याचे अनैतिक संबंध उघडकीस आल्यापासून त्याचे चारित्र्य जेवढे म्हणून कलंकित करता येईल तेवढे प्रसार माध्यमांनी केले. पण रोलेक्स सारख्या घड्याळ्यांच्या जाहिरातीत टायगर अजून झळकतोच आहे. कोणत्याही कंपनीने त्याच्याशी केलेली कॉन्ट्रॅक्ट्स रद्द केलेली मी तरी अजून ऐकलेली नाहीत.
एखाद्या नाटकाबद्दल खूप चांगले अभिप्राय वर्तमानपत्रात आले तर त्याची तिकिटविक्री वाढते असे मला तरी वाटत नाही. याउलट एखादे नाटक शिवराळ आहे, अश्लील विनोदानी भरलेले आहे असे नुसते एखादे वाक्य पेपरात येउद्या. नाटकाचे पुढचे शो हाऊसफुल होतात.
थोडक्यात असे म्हणता येईल की हे ‘वादाचा भोवरा‘ तंत्र खूप प्रभावी आहे आणि ते आपल्या सर्वांच्या मानसिकतेचा अगदी बरोबर वापर करते. आता या तंत्राच्या प्रभावाखाली येऊन आपण आपल्यालाच गंडवून घ्यायचे आणि या तंत्राच्या प्रभावाला बळी जायचे किंवा नाही हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.
10 मार्च 2010
दोन चार दिवसांनी या राजकीय पक्षाने आपले आंदोलन मागे घेतले. चित्रपटाचे वितरण झाले. एक आठवडाभर तरी ब्रेकिंग न्यूज मधे असलेला हा चित्रपट शेवटी आपल्याला बघायला मिळणार म्हणून लोकांनी प्रचंड गर्दी केली. थोड्या दिवसातच चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक यांच्या लक्षात आले की चित्रपट अगदीच सामान्य दर्जाचा आहे. बुद्धीवैभवाचा अभाव असलेले व प्रत्येक चित्रपट आवडीने बघणारे काही प्रेक्षक सोडले, तर बाकी प्रेक्षकांना आपण पद्धतशीर रित्या गंडवलो गेलो आहोत याची जाणीव प्रकर्षाने झाली.अर्थात त्यांना हे समजेपर्यंत चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपला भांडवली खर्च व फायदा हे दोन्ही कमावले होते पण ही बाब फारशी कोणाच्या लक्षात आली नाही.

‘वादाचा भोवरा‘ हा कोणत्याही उत्पादनाचे, निर्मितीचे किंवा प्रकल्पाचे, कमी खर्चात प्रभावी मार्केटिंग करण्याचा एक नवीन मार्ग उपलब्ध आहे याची जाणीव उत्पादकांना, निर्मितीकारांना किंवा प्रकल्प सादर करणार्यांना आता झाली आहे असे दिसते. आपले सामान्य दर्जाचे उत्पादन किंवा निर्मिती, लोकांच्यापर्यंत फारशी जाहिरातबाजी व खर्च न करता, या पद्धतीने पोचवता येते. अगदी एखाद्या राजकीय पक्षाने सुद्धा ही पद्धत अवलंबली तर तो अल्प कालात लोकांच्या नजरेसमोर चमकू शकतो. महाराष्ट्रात उदयाला आलेल्या एका नवीन राजकीय पक्षाने हीच पद्धत अवलंबली आहे. एका वादाच्या भोवर्यातून हा पक्ष बाहेर पडतो न पडतो तोच त्या पक्षाचे नेते परत काहीतरी आक्षेपार्ह विधाने करतात. परत एकदा ब्रेकिंग न्यूज आणि वादाचा भोवरा. प्रत्येक वादाच्या भोवर्याचे एकूण फलित, त्या पक्षाची वाढती लोकप्रियता हे असल्याने, हा पक्ष आता बराच लोकप्रिय झाल्यासारखा निदान दिसतो तरी आहे.
मॅकडॉनल्ड्स सारख्या फास्ट फूड साखळ्यांनी तर हे वादाच्या भोवर्याचे तंत्र चांगलेच आत्मसात केले आहे. कधीतरी कोणता तरी एक शास्त्रीय अहवाल प्रसिद्ध होतो. त्यात फास्ट फूड कसे हानीकारक आहे याचे भयानक चित्र उभे केलेले असते. लगेच माध्यमे त्या बातमीवर तुटून पडतात. परिणामी मॅकडॉनल्ड्सची विक्री आणखी वाढते. कधी ते विकत असलेले अन्न जंक फूड आहे म्हणून वाद तर कधी ट्रान्सफॅट्सच्या वापराबद्दल तर कधी ते वापरत असलेले मांस, हलाल आहे की नाही यावरून. थोड्या फार प्रमाणात हेच तंत्र कोका कोला किंवा पेप्सी सारखे सोडा उत्पादक वापरतात. मॅकडॉनल्ड्स घ्या किंवा कोक किंवा पेप्सी त्यांची विक्री या वादामुळे कधी कमी झाल्याचे ऐकले आहे का? नवीन वाद निर्माण झाला की उलटी ती आणखीन वाढतेच.

गॉल्फ सम्राट टायगर वूड्सचे उदाहरण आपल्या सगळ्यांना आठवत असेल. त्याचे अनैतिक संबंध उघडकीस आल्यापासून त्याचे चारित्र्य जेवढे म्हणून कलंकित करता येईल तेवढे प्रसार माध्यमांनी केले. पण रोलेक्स सारख्या घड्याळ्यांच्या जाहिरातीत टायगर अजून झळकतोच आहे. कोणत्याही कंपनीने त्याच्याशी केलेली कॉन्ट्रॅक्ट्स रद्द केलेली मी तरी अजून ऐकलेली नाहीत.
एखाद्या नाटकाबद्दल खूप चांगले अभिप्राय वर्तमानपत्रात आले तर त्याची तिकिटविक्री वाढते असे मला तरी वाटत नाही. याउलट एखादे नाटक शिवराळ आहे, अश्लील विनोदानी भरलेले आहे असे नुसते एखादे वाक्य पेपरात येउद्या. नाटकाचे पुढचे शो हाऊसफुल होतात.
थोडक्यात असे म्हणता येईल की हे ‘वादाचा भोवरा‘ तंत्र खूप प्रभावी आहे आणि ते आपल्या सर्वांच्या मानसिकतेचा अगदी बरोबर वापर करते. आता या तंत्राच्या प्रभावाखाली येऊन आपण आपल्यालाच गंडवून घ्यायचे आणि या तंत्राच्या प्रभावाला बळी जायचे किंवा नाही हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.
10 मार्च 2010

