तुमचा
कदाचित विश्वास बसणार नाही, पण भारतातल्या एका अतिशय वेगाने वाढणार्या,
डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या साखळीत काम करणार्या प्रत्येक कर्मचार्याला ही
शपथ घ्यावी लागते. मी बोलतो आहे बिग बझार या दुकानांच्याबद्दल. या
दुकानांना आधी हेटाळणीपूर्वक आणि नंतर कौतुकाने भारतीय वॉल मार्ट म्हणून
संबोधले जाऊ लागले आहे. पाच दहा वर्षांपूर्वी ग्राहकोपयोगी आणि वाणी सामान
रिटेलिंग करण्याच्या उद्योगात अनेक उद्योग समुहांनी उडी घेतली होती.
यातल्या बहुतेकांनी धंद्यात चांगलीच खोट खाल्ली. पैशांचे जबरदस्त पाठबळ
असणारे रिलायन्स सारखे काही कसेबसे टिकून आहेत. या पार्श्वभूमीवर बिग
बझारचे यश जास्तीच डोळ्यात भरण्यासारखे आहे.
मागच्या वर्षी बिग बझार दुकानांनी एकूण 1.5 बिलियन यू.एस. डॉलर्स एवढ्या
किंमतीची वार्षिक उलाढाल केली. 250 मिलियन खरेदीदारांनी या दुकानांना भेट
दिली. पॅन्टलून इंडिया हा उद्योग समूह ही दुकाने चालवतो. या समुहाचे प्रमुख
श्री बियाणी यांचे असे स्पष्ट मतच आहे की भारतीय ग्राहक हा वस्तूंच्या
किंमतींच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असतो. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे
पैसे वाचवण्याच्या बिग बझारच्या संस्कृतिमुळे ते वस्तूंच्या विक्रीच्या
किंमती आणखी खाली आणू शकतात. बिग बझारची पैसे वाचवण्याची संस्कृति अगदी
बारीक बारीक गोष्टींतून सुद्धा दिसून येते, बिग बझारच्या ऑफिसांना भेट
देणार्यांना चहाचा कप अर्धाच भरलेला मिळतो. त्यांचा कोणताच कर्मचारी
विमानाने बिझिनेस क्लासने कधीच प्रवास करत नाही. कोणताही कर्मचारी कधीच
तुम्हाला जॅकेट किंवा टाय लावलेला आढळणार नाही. स्वत: बियाणीच हाफ शर्ट व
पॅन्ट याच वेशात नेहमी असतात. कंपनीसाठी प्रवास करून आलेल्या प्रत्येक
कर्मचार्याला प्रवास खर्च परत मिळण्याआधी हा प्रवास खरोखरच जरूरीचा होता
का? या प्रश्नाचे लेखी उत्तर व्यवस्थापनाला द्यावे लागते. कंपनीच्या
ऑफिससाठी लागणारी जागा कमीत कमी क्षेत्रफळाची असावी या कडेही कंपनी लक्ष
देते. मुख्य कचेरीत जास्त जागा आहे हे बघितल्यावर तिथल्या 400 लोकांत
दुसरीकडच्या ऑफिसांतले 260 लोक आणून बसवले गेले व जागेचा जास्तीत जास्त
उपयोग कसा केला जाईल हे बघितले गेले.
बिग बझारची दुकाने उत्तम प्रकाशयोजना असलेली व वातानुकुलित असली तरी ग्राहकांच्या ढकलगाड्या जेमतेम जातील एवढेच अंतर मधे ठेवून सामानाची शेल्फ्स मांडलेली असतात. पण ग्राहकांचे मानसशास्त्र मात्र ही दुकाने बरोबर ओळखतात. धान्ये मोठ्या पोत्यांच्यातून उघडीच ठेवलेली असल्याने ग्राहकांना त्यात हात घालून बघता येतो. बटाट्यांना नेहमीच माती असते, ज्यायोगे हे बटाटे नुकतेच शेतावरून आले असावेत असे वाटते. किंवा काही कुजलेले कांदे काळजीपूर्वक जमिनीवर पडलेले दिसतील असे बघितले जाते. त्यामुळे वर पेटीत ठेवलेले कांदे चांगले आहेत याची गिर्हाईकाला खात्री वाटते. स्वैपाकांच्या पळ्या, चमचे, झारे हे प्लॅस्टिकच्या आवरणात कधीच नसतात. गृहिणींना ते हातात धरून किती उपयोगी आहेत हे अजमावता येये. कोपर्यात ठेवलेल्या एका छोट्या चक्कीत ग्राहक थोडेसे धान्य दळून त्याचे पीठ कसे होते आहे हे बघू शकतो.
काही छोट्या छोट्या गोष्टींत लक्ष घालून, दुकाने चालवण्याचा खर्च कसा कमी करता येईल हे बघितले जाते. दुकानांचे तपमान थोडे जास्त ठेवणे, पाण्याची नासाडी टाळणे, पॅकिंग मटेरियल परत वापरणे, भंगार विक्री करणे या सारख्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात.
वॉल-मार्ट, टेसको, काफू, सारख्या अनेक मोठ्या आंर्तराष्ट्रीय कंपन्या, भारतातील धंद्यात कधी उतरता येईल याची आतुरतेने वाट पहात आहेत. आज ना उद्या त्यांना सरकारी परवानगी मिळेल पण भारतात येण्याआधी बिग-बझारच्या कार्यपद्धतीचा त्यांनी थोडा अभ्यास केला तर ते त्यांना आणि मुख्य म्हणजे भारतातल्या ग्राहकांनाही फायदेशीर होईल.
31 ऑगस्ट 2009

बिग बझारची दुकाने उत्तम प्रकाशयोजना असलेली व वातानुकुलित असली तरी ग्राहकांच्या ढकलगाड्या जेमतेम जातील एवढेच अंतर मधे ठेवून सामानाची शेल्फ्स मांडलेली असतात. पण ग्राहकांचे मानसशास्त्र मात्र ही दुकाने बरोबर ओळखतात. धान्ये मोठ्या पोत्यांच्यातून उघडीच ठेवलेली असल्याने ग्राहकांना त्यात हात घालून बघता येतो. बटाट्यांना नेहमीच माती असते, ज्यायोगे हे बटाटे नुकतेच शेतावरून आले असावेत असे वाटते. किंवा काही कुजलेले कांदे काळजीपूर्वक जमिनीवर पडलेले दिसतील असे बघितले जाते. त्यामुळे वर पेटीत ठेवलेले कांदे चांगले आहेत याची गिर्हाईकाला खात्री वाटते. स्वैपाकांच्या पळ्या, चमचे, झारे हे प्लॅस्टिकच्या आवरणात कधीच नसतात. गृहिणींना ते हातात धरून किती उपयोगी आहेत हे अजमावता येये. कोपर्यात ठेवलेल्या एका छोट्या चक्कीत ग्राहक थोडेसे धान्य दळून त्याचे पीठ कसे होते आहे हे बघू शकतो.

काही छोट्या छोट्या गोष्टींत लक्ष घालून, दुकाने चालवण्याचा खर्च कसा कमी करता येईल हे बघितले जाते. दुकानांचे तपमान थोडे जास्त ठेवणे, पाण्याची नासाडी टाळणे, पॅकिंग मटेरियल परत वापरणे, भंगार विक्री करणे या सारख्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात.
वॉल-मार्ट, टेसको, काफू, सारख्या अनेक मोठ्या आंर्तराष्ट्रीय कंपन्या, भारतातील धंद्यात कधी उतरता येईल याची आतुरतेने वाट पहात आहेत. आज ना उद्या त्यांना सरकारी परवानगी मिळेल पण भारतात येण्याआधी बिग-बझारच्या कार्यपद्धतीचा त्यांनी थोडा अभ्यास केला तर ते त्यांना आणि मुख्य म्हणजे भारतातल्या ग्राहकांनाही फायदेशीर होईल.
31 ऑगस्ट 2009