बरोबर
48 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी मी फर्गुसन महाविद्यालयात
प्री-डिग्रीच्या वर्गात (सध्याची 12 वी) शिकत होतो. सकाळी दहाच्या सुमारास
आम्हाला पहिला तास फिजिक्सचा असे. हा तास महाविद्यालयाच्या फिजिक्स
विभागात, पी-2 या क्लास-रूम मधे असे व त्या दिवशीही तो तसाच चालू होता.
अकस्मात शिक्षकांच्या प्रवेशद्वारातून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी.जी.
ढवळे सर आत येताना दिसले. मुठा नदीला फार मोठा पूर येण्याची शक्यता
असल्याने महाविद्यालयाचे काम काज बंद करण्यात आले असून सर्व
विद्यार्थ्यांनी घरी जावे अशी सूचना त्यांनी केली. तो दिवस होता आजचाच,
म्हणजे 12 जुलै.
नदीला पूर येणे ही काही फारशी नवीन बाब पुणेकरांना त्या काळात तरी वाटत नसे. त्यामुळे महाविद्यालय कसे काय बंद केले बुवा? अशा थोड्याश्या आश्चर्यचकित मुद्रेनेच आम्ही बाहेर पडलो. सरळ घरी जाण्याचा प्रश्नच नव्हता. सायकल आपोआपच लकडी पुलाकडे वळली. तिथे पाहिले तर वाहतुक नेहमीसारखीच सुरू होती. 2/4 पोलिस हवालदार जास्त वाटले, पण सायकलवरून डबल सीट कां चालला? म्हणून दंड करण्याऐवजी ते सगळ्यांना लवकर लवकर चला म्हणून विनंती करताना तेवढे दिसले. एकंदरीत फारसे सिरियस काही नसावे असे वाटून मी घरी परत आलो. गाडी अंगणात दिसली नाही म्हणून बघितले तर आमची आई, माझ्या भावाला, शाळा नदीच्या पैलतीरावर असल्याने, घरी आणण्यासाठी गेल्याचे समजले. वडील कारखान्यात गेले होते. थोड्याच वेळात आई भावाला घेऊन परतली. मला घरी पाहून तिचा जीव भांड्यात पडला. थोड्या वेळाने वडील पण घरी आले. कारखाना नदीच्या काठावरच असल्याने, तो बंद करूनच ते आले होते. तेंव्हा मोठा पूर येणार आहे एवढेच कळले होते. मी परत सायकल बाहेर काढली आणि फार दूर न जाण्याचे आईला कबूल करून कर्वे रस्त्याकडे वळलो. एव्हांना पोलिसांनी शंकराच्या देवळाकडे जाणारा रस्ता (सध्या नळ स्टॉप कडून मेहेंदळॆ गॅरेजकडे जाणारा चौक) बंद केला होता. समोर नदीचे लालसर पाणी एव्हांना दिसायला लागले होते. तसाच थोडा पुढे गेलो. एम.इ.स. कॉलेजपाशी (सध्याचे गरवारे) नदीचे पाणी कर्वे रस्त्यावर आलेले दिसले. मग जरा वेळ इकडे तिकडे बघून घरी परत आलो.

अफवांचे पीकच फुटले असल्यासारखे एकूण दिसत होते. कोणी म्हणे खडकवासला धरणावरून पाणी वाहते आहे. कोणी म्हणे संपूर्ण शहरच बुडणार आहे. लोकांच्यात घबराट तर इतकी उडाली होती की बरेच लोक हनुमान टेकडीवरच जाऊन बसले होते. कुठलीही अधिकृत बातमी कळू शकत नव्हती. आकाशवाणी केंद्रावरून तर कोणीतरी गायक कंटाळवाण्या आवाजात रागदारीच गात होता. ‘सकाळ’ वर्तमानपत्राच्या ऑफिसमधला फोन, कोणी उचलतच नव्हते. पोलिसांनाही काही माहिती नव्हती. नळाला पाणी येण्याचे केंव्हाच बंद झाले होते. उपहारगृहे, हॉटेल्स सर्व बंद झाले होते. माझ्या वडिलांच्या कारखान्यात, तेंव्हा 60/65 मंडळी कामाला होती. त्यांना घरीही जाणे शक्यच नव्हते आणि त्यांचे डबेही येणे शक्य नव्हते. मग आमच्या आईने दोन बायकांच्या मदतीने या सगळ्या लोकांना पिठले भात खाऊ घातल्याचे मला आठवते.
दुपारी 2 च्या सुमारास पाणी आणखी वाढल्याचे समजले. आता मात्र बहुतेकांचे चेहरे चांगलेच गंभीर झाल्याचे कळत होते. मुख्य अडचण म्हणजे कोणतीही अधिकृत बातमी मिळतच नव्हती. असाच तो दिवस आम्ही सगळ्यांनी बसून काढला. वीज नव्हतीच त्यामुळे सगळीकडे रात्री कंदिल लागले. अधिकृत रित्या तोपर्यंत कळत काहीच नव्हते. माझ्या वडीलांच्याकडे एक बॅटरीवर चालणारा ट्रांझिस्टर रेडियो होता. त्यावरूनही कसलीही घोषणा कोणत्याही अधिकृत सूत्राकडून आतापर्यंत नव्हती. रात्री 9 वाजताच्या दिल्लीहून येणार्या बातम्यांच्यात, प्रथम आम्ही ऐकले की पानशेतचे धरण फुटल्यामुळे पुण्यात पूर आला आहे आणि तो ओसरतो आहे. खडकवासल्याचे धरण पानशेतच्या पुढे असल्याने त्याचे काय? या प्रश्नाचे काहीही उत्तर कोणालाच माहिती नव्हते. बहुतेकांनी ती रात्र जागून काढली. दुसर्या दिवशी सकाळी खडकवासला फुटले अशी अफवा फुटली आणि प्रचंड घबराट उडाली. पण नदीचे पाणी मात्र ओसरतच गेले. दोन दिवसांनंतर पुराची भिती सगळ्यांच्याच मनातून गेली पण समोर आ वासून उभे राहिले, जनसामान्यांचे जीवन पूर्ववत करण्याचे एक प्रचंड आव्हान!

सकाळच्या छपाईयंत्रांच्यात चिखल गेल्याने ती कुचकामीच झाली होती. दुसरा एक छोटा प्रेस चालू करून सकाळने 2 दिवसात वर्तमानपत्र बाहेर काढले व इतक्या दिवसांनंतर सत्य परिस्थिती सर्वसामान्यांना समजली. नदीला सकाळी 11च्या सुमारास तो पानशेत फुटल्याने व 2 च्या सुमारास वाढलेले पाणी, खडकवासला फुटल्याने आले हे लोकांना प्रथम समजले. बंड गार्डनचा सोडला तर बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते. नदीच्या दक्षिण किनार्यावर असलेल्या नारायण, सदाशिव, कसबा आणि सोमवार या पेठांची अपरिमित झालेली हानीही याच वेळेला आमच्या नजरेसमोर आली. माझा एक वर्गमित्र स्वानंद गोगटे याचे घर नदीच्या अगदी काठी होते. अंगावरच्या कपड्यांशिवाय त्यांच्या हाती काहीच उरले नव्हते. अशीच परिस्थिती हजारो पुणेकरांची झाली होती. नदीच्या काठच्या रस्त्यांवर एक दीड फूट जाडीचा चिखलाचा थर आणि त्यामुळे येणारा एक विशिष्ट वास हा सर्व पुणेकरांच्या पुढची दोन तीन वर्षे चांगलाच परिचयाचा झाला होता.

शहराचा पाणी पुरवठाच नष्ट झाल्याने आता पुढे काय हा प्रश्न होताच. धरणे फुटल्याने नदीला सतत पाणी होते. त्याचा वापर करून एका जोडकालव्याद्वारे शहराचा पाणीपुरवठा परत चालू करता ये ईल अशी एक योजना एक अभियंते श्री. ठोसर यांनी मांडली. महानगरपालिका आणि सरकार यांनी ती मान्य केली आणि महिन्याभरात पाणी पुरवठा चालू झाला. पूरग्रस्तांचे पुनर्वसनात खूप लोकांनी मदत केली सैन्याच्या दक्षिण कमांडनेही चांगलाच हातभार लावला.

सरकारी यंत्रणांची ढिसाळ कामगिरी लोकांच्या चांगलीच नजरेत आली. रोम जळत असताना सम्राट निरो फिडल वाजवत होता असे म्हणतात. आकाशवाणीने, आपण त्याचे आधुनिक वंशज असल्याचे पुराच्या काळात रागदारी ऐकवून दाखवून दिले. आता वीजच नसल्याने बहुतेकांना ते ऐकताच आले नाही हे त्यांचे नशीबच! नंतर समजले की बी.बी.सी. ने आकाशवाणीच्या आधीच, पुराची बातमी जगभर लोकांना ऐकविली होती.

या पुराने पुण्याचे स्वरूपच बदलले. जुने ऐतिहासिक पेशवेकालीन पुणे वाहूनच नष्ट झाले. नदीच्या काठची मध्यमवर्गीय वस्ती हळूहळू कोथरूड वगैरे उपनगरांच्याकडे सरकू लागली. पण याचबरोबर जुन्या पुण्याचा चार्मच गेला. पुणे इतर एखाद्या शहरासारखेच वाढू लागले. अनियंत्रित, बकाल आणि अस्तावस्त.
12 जुलै 2009
नदीला पूर येणे ही काही फारशी नवीन बाब पुणेकरांना त्या काळात तरी वाटत नसे. त्यामुळे महाविद्यालय कसे काय बंद केले बुवा? अशा थोड्याश्या आश्चर्यचकित मुद्रेनेच आम्ही बाहेर पडलो. सरळ घरी जाण्याचा प्रश्नच नव्हता. सायकल आपोआपच लकडी पुलाकडे वळली. तिथे पाहिले तर वाहतुक नेहमीसारखीच सुरू होती. 2/4 पोलिस हवालदार जास्त वाटले, पण सायकलवरून डबल सीट कां चालला? म्हणून दंड करण्याऐवजी ते सगळ्यांना लवकर लवकर चला म्हणून विनंती करताना तेवढे दिसले. एकंदरीत फारसे सिरियस काही नसावे असे वाटून मी घरी परत आलो. गाडी अंगणात दिसली नाही म्हणून बघितले तर आमची आई, माझ्या भावाला, शाळा नदीच्या पैलतीरावर असल्याने, घरी आणण्यासाठी गेल्याचे समजले. वडील कारखान्यात गेले होते. थोड्याच वेळात आई भावाला घेऊन परतली. मला घरी पाहून तिचा जीव भांड्यात पडला. थोड्या वेळाने वडील पण घरी आले. कारखाना नदीच्या काठावरच असल्याने, तो बंद करूनच ते आले होते. तेंव्हा मोठा पूर येणार आहे एवढेच कळले होते. मी परत सायकल बाहेर काढली आणि फार दूर न जाण्याचे आईला कबूल करून कर्वे रस्त्याकडे वळलो. एव्हांना पोलिसांनी शंकराच्या देवळाकडे जाणारा रस्ता (सध्या नळ स्टॉप कडून मेहेंदळॆ गॅरेजकडे जाणारा चौक) बंद केला होता. समोर नदीचे लालसर पाणी एव्हांना दिसायला लागले होते. तसाच थोडा पुढे गेलो. एम.इ.स. कॉलेजपाशी (सध्याचे गरवारे) नदीचे पाणी कर्वे रस्त्यावर आलेले दिसले. मग जरा वेळ इकडे तिकडे बघून घरी परत आलो.

होळकर पूल
अफवांचे पीकच फुटले असल्यासारखे एकूण दिसत होते. कोणी म्हणे खडकवासला धरणावरून पाणी वाहते आहे. कोणी म्हणे संपूर्ण शहरच बुडणार आहे. लोकांच्यात घबराट तर इतकी उडाली होती की बरेच लोक हनुमान टेकडीवरच जाऊन बसले होते. कुठलीही अधिकृत बातमी कळू शकत नव्हती. आकाशवाणी केंद्रावरून तर कोणीतरी गायक कंटाळवाण्या आवाजात रागदारीच गात होता. ‘सकाळ’ वर्तमानपत्राच्या ऑफिसमधला फोन, कोणी उचलतच नव्हते. पोलिसांनाही काही माहिती नव्हती. नळाला पाणी येण्याचे केंव्हाच बंद झाले होते. उपहारगृहे, हॉटेल्स सर्व बंद झाले होते. माझ्या वडिलांच्या कारखान्यात, तेंव्हा 60/65 मंडळी कामाला होती. त्यांना घरीही जाणे शक्यच नव्हते आणि त्यांचे डबेही येणे शक्य नव्हते. मग आमच्या आईने दोन बायकांच्या मदतीने या सगळ्या लोकांना पिठले भात खाऊ घातल्याचे मला आठवते.

बंडगार्डनचा पूल
दुपारी 2 च्या सुमारास पाणी आणखी वाढल्याचे समजले. आता मात्र बहुतेकांचे चेहरे चांगलेच गंभीर झाल्याचे कळत होते. मुख्य अडचण म्हणजे कोणतीही अधिकृत बातमी मिळतच नव्हती. असाच तो दिवस आम्ही सगळ्यांनी बसून काढला. वीज नव्हतीच त्यामुळे सगळीकडे रात्री कंदिल लागले. अधिकृत रित्या तोपर्यंत कळत काहीच नव्हते. माझ्या वडीलांच्याकडे एक बॅटरीवर चालणारा ट्रांझिस्टर रेडियो होता. त्यावरूनही कसलीही घोषणा कोणत्याही अधिकृत सूत्राकडून आतापर्यंत नव्हती. रात्री 9 वाजताच्या दिल्लीहून येणार्या बातम्यांच्यात, प्रथम आम्ही ऐकले की पानशेतचे धरण फुटल्यामुळे पुण्यात पूर आला आहे आणि तो ओसरतो आहे. खडकवासल्याचे धरण पानशेतच्या पुढे असल्याने त्याचे काय? या प्रश्नाचे काहीही उत्तर कोणालाच माहिती नव्हते. बहुतेकांनी ती रात्र जागून काढली. दुसर्या दिवशी सकाळी खडकवासला फुटले अशी अफवा फुटली आणि प्रचंड घबराट उडाली. पण नदीचे पाणी मात्र ओसरतच गेले. दोन दिवसांनंतर पुराची भिती सगळ्यांच्याच मनातून गेली पण समोर आ वासून उभे राहिले, जनसामान्यांचे जीवन पूर्ववत करण्याचे एक प्रचंड आव्हान!

ओंकारेश्वर
सकाळच्या छपाईयंत्रांच्यात चिखल गेल्याने ती कुचकामीच झाली होती. दुसरा एक छोटा प्रेस चालू करून सकाळने 2 दिवसात वर्तमानपत्र बाहेर काढले व इतक्या दिवसांनंतर सत्य परिस्थिती सर्वसामान्यांना समजली. नदीला सकाळी 11च्या सुमारास तो पानशेत फुटल्याने व 2 च्या सुमारास वाढलेले पाणी, खडकवासला फुटल्याने आले हे लोकांना प्रथम समजले. बंड गार्डनचा सोडला तर बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते. नदीच्या दक्षिण किनार्यावर असलेल्या नारायण, सदाशिव, कसबा आणि सोमवार या पेठांची अपरिमित झालेली हानीही याच वेळेला आमच्या नजरेसमोर आली. माझा एक वर्गमित्र स्वानंद गोगटे याचे घर नदीच्या अगदी काठी होते. अंगावरच्या कपड्यांशिवाय त्यांच्या हाती काहीच उरले नव्हते. अशीच परिस्थिती हजारो पुणेकरांची झाली होती. नदीच्या काठच्या रस्त्यांवर एक दीड फूट जाडीचा चिखलाचा थर आणि त्यामुळे येणारा एक विशिष्ट वास हा सर्व पुणेकरांच्या पुढची दोन तीन वर्षे चांगलाच परिचयाचा झाला होता.

जवानांची मदत
शहराचा पाणी पुरवठाच नष्ट झाल्याने आता पुढे काय हा प्रश्न होताच. धरणे फुटल्याने नदीला सतत पाणी होते. त्याचा वापर करून एका जोडकालव्याद्वारे शहराचा पाणीपुरवठा परत चालू करता ये ईल अशी एक योजना एक अभियंते श्री. ठोसर यांनी मांडली. महानगरपालिका आणि सरकार यांनी ती मान्य केली आणि महिन्याभरात पाणी पुरवठा चालू झाला. पूरग्रस्तांचे पुनर्वसनात खूप लोकांनी मदत केली सैन्याच्या दक्षिण कमांडनेही चांगलाच हातभार लावला.

लकडी पूल
सरकारी यंत्रणांची ढिसाळ कामगिरी लोकांच्या चांगलीच नजरेत आली. रोम जळत असताना सम्राट निरो फिडल वाजवत होता असे म्हणतात. आकाशवाणीने, आपण त्याचे आधुनिक वंशज असल्याचे पुराच्या काळात रागदारी ऐकवून दाखवून दिले. आता वीजच नसल्याने बहुतेकांना ते ऐकताच आले नाही हे त्यांचे नशीबच! नंतर समजले की बी.बी.सी. ने आकाशवाणीच्या आधीच, पुराची बातमी जगभर लोकांना ऐकविली होती.

लकडी पूल मागे पर्वती दिसते आहे.
या पुराने पुण्याचे स्वरूपच बदलले. जुने ऐतिहासिक पेशवेकालीन पुणे वाहूनच नष्ट झाले. नदीच्या काठची मध्यमवर्गीय वस्ती हळूहळू कोथरूड वगैरे उपनगरांच्याकडे सरकू लागली. पण याचबरोबर जुन्या पुण्याचा चार्मच गेला. पुणे इतर एखाद्या शहरासारखेच वाढू लागले. अनियंत्रित, बकाल आणि अस्तावस्त.
12 जुलै 2009